महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा; गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांना धोका
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विशेषतः शेतकरी वर्ग चिंतेत असून, रब्बी हंगामातील काढणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मध्य…
