शेतकऱ्यांसाठी खत पुरवठा सुनिश्चित; संकट काळात सरकारची मोठी घोषणा
देशात संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. आगामी पेरणी हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे अनेक देशांमध्ये खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत भारतातही…
